IPL 2025 स्थगित   

तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ तूर्तास स्थगित करण्याचा निर्यण घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरूवारचा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्यानंतर आयपीएलचे सामने होणार की, नाहीत असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आता बीसीसीआयने सर्व संघ मालकांसोबत चर्चा करून आयपीएल तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणांमुळे ब्लॅकआऊटची घोषणा करण्यात आली होती. प्रेक्षकांना तातडीने स्टेडियममधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे पुढील सामना होणार की नाही याबाबत साशंकता होती.
 
भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील धर्मशाला येथे खेळवला जाणारा सामना आधीच अहमदाबादला हलवला होता. मात्र आता आयपीएलचे पुढील सामने तूर्तास खेळवले जाणार नाहीत. आयपीएलचे आतापर्यंत ५७ सामने झाले असून १६ सामने बाकी आहेत. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द केला होता. त्यामुळे आज होणारा आरसीबी आणि लखनऊनमधील सामना होणार की नाही याबाबत शंका होती. मात्र आता बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धा तूर्तास थांबवण्यात आली आहे.
 
भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकड्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. पाकिस्तानने गुरूवारी रात्री ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हा हल्ला परतावून लावला. या युद्धामुळे भारताने अंतर्गत खबरदारी घेतली असून सीमाभागांमध्ये ब्लॅकआऊट आणि देशातील २६ विमानतळे बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम आयपीएलच्या सामन्यांवरही झाला. याबाबत बीसीसीआयकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
 

Related Articles